"... हे सारं आत्मकथन चंदाताईच्या सहजशैलीतून, आवाजाच्या चढ उतारासह आणि चेहऱ्यावरच्या भावभावानांसह मूर्तिमंत डोळ्यासमोर उभं राहत आहे. हे या आत्मचरित्र ग्रंथाच यश आणि वैशिष्ट्य आहे. ताईची भाषा अगदी खास त्यांची स्वतःचीच आहे. त्यांच्या हातच्या खास पदार्थासारखी. ... त्यांच लेखन साधं, सरळ आहे. अगदी रोजच्या बोलण्या वागण्यासारखं. त्यात लालित्य आहेच. ते लालित्य खास मऱ्हाठी गावरान चवीचं आहे. त्यात कृत्रिमता नाही. ...ताईची भाषा ही प्रवाही आहे, निर्भिड आहे. ती जेवढी परखड आहे तेवढीच योग्य जागी मृदू आहे. अलंकारीक, साहित्यिकी, अतिशयोक्ती किंवा खोट्या विनयाची नक्षी तीत नाही. म्हणूनच मराठीतील जी चांगली आणि खरी आत्मचरित्रे आपल्यापुढे आहेत त्यात चंदाताई कोंडालकर यांच्या या आत्मचरित्राला आपोआप मानाच पान आणि स्थान जाणते रसिक देतीलच. ... या आत्मचरित्रातील प्रत्येक दालन वाचकांना रमवील, सुखवील अन काही ना काहीतरी शिकवील, वाचून पहा ."
please login to review product
no review added